Friday, April 24, 2020

भोई समाजाचे व्यवसाय बंद होण्याची कारणे....


भोई समाजाचे व्यवसाय बंद होण्याची कारणे... लेख: श्री.दिपक भोई चाळीसगाव



भोई समाजाचा उल्लेख रामायण,महाभारत सह इतर महाकाव्यात दिसतो काळा बरोबरच भोई समाजाच्या उपजिवीकेची साधन देखिल बदलत गेली किंवा काही प्रमाणात तीच राहिली. 
आपले पारंपरिक व्यवसाय:
१)राजे महाराज यांची पालखी वाहने.
२)मासेमारी
३)चणे फुटाणे विक्री
४)गाढवावर वाहतूक करणे.


     आता प्रश्न असा आहे की,भोई समाजाचे व्यवसाय बंद पडत आहेत किंवा त्या व्यवसायांवर इतरांनी अतिक्रमण केलेले दिसते. अतिक्रमण होण्यास काही प्रमाणात आपणही जबाबदार आहोत असे मला वाटते कारण 
१)जे समाज बांधव आर्थिक द्रुष्ट्या पुढारलेले आहेत त्यांच्याकडे कामगार म्हणून भोई समाजाची मुले नाहित किंवा जे समाज घटक आपल्याकडे कामगार म्हणून भोई समाजाचे मुले ठेवतात ते पाहिजे तसे काम करताना दिसत नाही.
२)भोई समाजाचे व्यवसाय बंद पडण्याचे अजून एक मुख्य कारण म्हणजे आपापसात असलेली स्पर्धा सुरू आहे जसे आपणच इतर समाज बांधवांपेक्षा कमी भावाने विक्री करणे किंवा जास्त भावाने खरेदी करणे.
३) माझ्याकडील माल हा भोई समाजाच्याच इतरांपेक्षा चांगल्या प्रतीचा आहे असे ग्राहकांना सांगणे.
४)आपापसातील स्पर्धा वाढल्यामुळे मेहनत जास्त असते आणि त्यामानाने नफ्याचे प्रमाण कमी होते.
५)सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपली कला ( जाळे विणने,चणे फुटाणे भाजणे,शेंगदाणे खारे करणे,फरसाण तयार करणे) इतर लोकांना माहीत करणे अशामुळे आपले व्यवसाय इतर समाजाकडे आपोआप जातात.
६)मच्छीमार सोसायट्यांमध्ये भोई समाज बांधवांना वगळून इतरांना सभासद करणे.
७)मच्छीमारी करण्यासाठी इतर समाजाच्या लोकांना प्राधान्य देणे.
       अशा अनेक प्रकारच्या समस्यांमुळे भोई समाजाचे व्यवसाय बंद होत आहेत किंवा इतर समाजाकडे वळत आहेत.
समाज बांधवांनी यावर चिंतन करून भोई समाजातील व्यवसायात इतरांची घुसखोरी थांबवली पाहिजे. यावर चिंतन होणे गरजेचे आहे.
 💐 जय भोईराज💐
 लेख
श्री.दिपकभाऊ भोई चाळीसगाव

Wednesday, April 22, 2020

मुला मुलींच्या पालकांनी लग्नासबंधीत विचार बदलण्याची गरज....


 मुला मुलींच्या पालकांनी लग्नासबंधीत विचार बदलण्याची गरज....

आज समाजातील बरेचसे तरूण,तरूणी यांना गुणवत्ता व  व्यावसायिक शिक्षण या अभावी खाजगी वा सरकारी नोकर्‍या मिळू शकत नाही.सुरवातीला तुटपुंज्या व कमी पगारावर नोकरी करून अनुभव घेवून नोकरी करीत नाही.(स्ट्रगल करावा लागतो हेच त्यांना व त्यांच्या पालकांना कळत नाही.)
यामुळे वय वाढत जाते.
शिक्षण वा नोकरीमुळे पालकांच्या अवाजवी अपेक्षा वाढतात.खाजगी , जरी चांगली नोकरी असली तरी असे मुलाचे स्थळ नको असते.जर असली तर कमीत कमी 30—40 हजाराची नोकरी असावी.कमी शिकलेला नको.तो स्वतंत्र एकटा रहाणारा असला पाहिजे,शक्यतो स्वत:चे घर असले पाहिजे.अशा अनेक वधूपित्यांच्या अपेक्षा असतात.
तर मुलेही नोकरीवाली वा नोकरी करू शकणारी , उच्चशिक्षित असावी.सुंदर व गोरी  असावी.वधूपित्याची आर्थिक स्थिती चांगली असावी.अशा अपेक्षा असतात.
ह्या अपेक्षांमुळे वये वाढत आहेत.
 मुलींच्या पालकांना नम्र विनंती👏
नुसता Biodata बघुन न थांबता प्रत्यक्ष स्थळाला भेट देऊन परिस्थिती पाहणी करा मग निर्णय घ्या. प्रत्येकाला सरकारी नोकरी कुठून मिळणार आपण स्वतःच्या मुलांना सरकारी नोकरी लावु शकतो कां? याचा विचार करा, बागायती शेती असेल तर शेतात जाऊन पाहणी करा', घर बसल्या पाकिस्तान सारखे स्वप्न बघू नका.
       शून्यातून जग निर्माण करणारी मुले आहेत आणि श्रीमंतीची वाट लावणारीही मुले आहेत. नुसती डिग्री बघुन निर्णय घेत असाल तर हि तुमची मोठी चूक आहे. बिचारी इंजिनिअर झालेली मुले  Company मधे 8000/- पगाराने सुपरव्हिजन करतात. पोलिस भरतीत जाऊन बघा तुम्हाला ज्या डिग्रीची मुले पाहिजेत ते मुल बिचारे रांगेत उभे राहतात. कदाचित त्या रांगेत आपलाही मुलगा असू शकतो याचा विचार करा आणि प्रत्यक्ष स्थळ बघा मगच निर्णय घ्या. आणि नुसती डिग्रीच बघायची असेल तर रात्री 9:00 नंतर बियरबार मधे जाऊन बघा अनेक डिग्रीवाले दिसतील. बिचाऱ्यानां नोकरी मिळत नाही म्हणून गम भूलाने की दवासे प्यार करते है ! आज अनेक मुलींचा बायोडाटा बघून हसावेसे वाटते कारण जन्मतारीख बघा बऱ्याच मुली 25 ते 28 वर्षाच्या आहेत. त्यांच्या ईच्छा, भावना यांचा विचार करत नाही. आजच्या युगात आयुष्य सरासरी 60 वर्ष आहे, 30 वर्षात कोणते सुख मिळवायचे. 
 सरकारी नोकरीच्या दुकानावर जा आणि नोकरी मागा 1,00,000/-रू आम्ही देतो आम्ही नोकरीची वाट पाहतो.
  आजची  परिस्थिती तर फार गंभीर आहे.. "अन्न" सर्वांनांच हवंय..पण.. "शेतकऱ्याशी लग्न " करावं असं कोणालाच वाटत नाही.. "पाणी" सर्वांनाच हवंय.पण.. "पाणी"  वाचवावेसे कोणालाच वाटत नाही.. "सावली" सर्वांनाच हवीय..पण.. "झाडे"
 लावावी व ती जगवावी असे कोणालाही वाटत नाही.. "सुन" सर्वांनाच हवीं आहे.. पण.. "मुलगी"व्हावी असं कोणालाच वाटत नाही.. विचार करावा असे प्रश्न...पण.. विचार करावा असं कोणालाच वाटत नाही.. 
 👏चुकभुल क्षमस्व....👏

👍कटू आहे पण सत्य आहे👍
🙏🙏🙏🙏🙏
🌹🌹🌹🌹🌹
सदैव आपलेच

भोई समाज युवा मंच महाराष्ट्र

Tuesday, April 21, 2020

कन्या जन्माचा सत्कार उपक्रम ग्रुप, शहादा


कन्या जन्माचा सत्कार उपक्रम ग्रुप, शहादा जि. नंदुरबार (बेटी बचाओ - बेटी पढाओ)
 
मुलगी जन्माला आली की तिला आपण समाजात जास्त महत्त्व देत नाही, कारण आपल्या मते वंशाचा दिवा हा मुलगा असतो म्हणूनच मुलाला समाजात महत्वाचे मानले जाते. आणि मुलीला नकारात्मकतेच्या नजरेने पाहिले जाते, आणि महत्व ही दिले जात नाही.
पण शहादा येथील भोई समाजातील युवकांच्या संकल्पनेतून समाजापुढे एक नवीन आदर्श निर्माण झाला आहे. सन २०१७ पासून कन्या जन्माचा सत्कार उपक्रम ह्या युवकांनी शहादा भोई समाजात सुरू केला, सुरवातीस या सत्काराचे स्वरूप असे होते की, शहादा शहरातील भोई समाजात नवजात जन्मलेली कन्या आणि तिच्या परिवाराचा श्री.राजा खेडकर सर (राजकुमार) यांच्याकडून पुष्पगुच्छ, तर श्री. धनेश्वर भोई यांच्याकडून पेढे आणि छोटीशी आर्थिक मदत देऊन सत्कार केला जायचा.
 नंतर ह्या सत्काराचे स्वरूप बदलले आणि सण २०१८ मध्ये श्री. नरेंद्र हिरालाल वाडीले ऊर्फ नरु भाऊ (तालुकाध्यक्ष - भोई समाज, शहादा) यांनी प्रत्येक सत्काराच्या वेळी ३१०० रुपयाची भेट फिक्स डिपॉझिट म्हणून कन्येच्या च्या स्वागतासाठी देऊ केली, तसेच श्री. जितेंद्र हिरालाल वाडीले (वाडीले सर) यांच्याकडून प्रत्येक सत्कारावेळी १०० रुपयाची भेट ह्या समाज बांधवांकडून दिली जाते.
कन्या जन्माचा पहिल्या सत्काराची सुरुवात राम नगर, शहादा येथील श्री. किशोर वामन साठे यांना कन्यारत्न झाल्याबद्दल ९ जानेवारी २०१७ मध्ये करण्यात आला आणि आतापर्यंत एकुण ३६ परिवाराचा कन्या जन्माचा स्वागताचा सत्कार उपक्रम शहादा शहराच्या विविध भागात असणाऱ्या भोई समाज बांधवांच्या घरी जाऊन  करण्यात आला आहे, ह्या सत्कारावेळी अशा कन्येचा सत्कार केला जातो , की ज्या घरात कन्या जन्माला येते म्हणजेच ( शहादा शहरात असलेली सून आणि नवीन जन्मलेली कन्या , कन्येचे वडील आणि त्यांचा परिवार म्हणजे सुनेच्या सासरवाडीत पुष्पगुच्छ, पेढे, आणि ३१०० रुपयाची मुलीच्या नावे फिक्स डिपॉझिट बँकेत जमा केली जाते, सोबत सुनेचा ही सन्मान केला जातो ) तसेच (माहेरी असणाऱ्या मुलीला जर कन्यारत्न प्राप्त झाली तर त्या कन्येचा आणि परिवाराचा पुष्पगुच्छ, पेढे, आणि छोटीशी मदत म्हणून 100 ₹ दिले जातात). अशा प्रकारे वरीलप्रमाणे सत्कार उपक्रम राबविला जातो,

ह्या सत्काराच्या वेळी आम्ही कन्या जन्माचे महत्त्व पटवून देतो आणि समाजात त्यांना त्यांचा योग्य तो मान सन्मान दिला गेला पाहिजे असे सांगितले जाते आणि पाहायला गेलं तर वडिलांची काळजी ही मुलगीच घेत असते, आणि ती सर्वांची काळजी घेते म्हणून ती बापाची लाडकी असते, म्हणूनच उपक्रमाचा उद्देश हा बेटी बचाओ - बेटी पढाओ आहे असे सांगितले जाते,तसेच समाजातील मान्यवरांच्या हस्ते कन्या जन्माचा स्वागताचा कार्यक्रम केला जातो,
                  तसेच कन्याबद्दल जनजागृती निर्माण केली जाते, अशा प्रकारे कन्या जन्माचा सत्कार उपक्रम ग्रुप, शहादा येथील समाज बांधव गेल्या ३ वर्षांपासून असा अनोखा उपक्रम आनंदात करीत आहेत.
                      ह्या उपक्रमाबद्दल संपूर्ण नंदुरबार जिल्हा भोई समाजात कौतुक केले जात आहे. तसेच उपक्रमाची दखल घेत नंदुरबार जिल्हयात भोई समाजबांधवांनी हा उपक्रम नंदुरबार, प्रकाशा, धडगाव, पिंगाणे, तळोदा इ. गावामध्ये सुरू केला, तसेच इतर समाजातही उपक्रमाची दखल घेत शहादा, नंदुरबार ,लोणखेडा, सुलतानपुर येथे  सुरू केला आहे. आणि शेजारी असलेल्या धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात पंचायत समिती मध्ये ही अशाप्रकारचा सत्कार उपक्रम राबविण्यात आला.

हा उपक्रम नंदुरबार जिल्हयात सर्वप्रथम श्री. मिलिंद वाडीले यांनी सुरू करण्याचा मानस केला, आणि त्यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली, तसेच सोबत युवक ही खांद्याला खांदा लावून उपक्रम चांगल्यारित्या पार पाडत आहेत.

कन्या जन्माचा सत्कार उपक्रम ग्रुप, शहादा दरवर्षी राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त म्हणजेच कन्येच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी कलाकौशल्य म्हणून रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा , नृत्य स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम  घेऊन तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय कार्यक्रम  बेटी बचाओ - बेटी पढाओ,कन्या, स्त्री भ्रूण हत्या इ.विषयावर आयोजित केले जातात,

 तसेच समाजातील गोरगरीब जनतेला संकटकाळी सर्वोतोपरी मदत ह्या ग्रुप तर्फे केली जाते ,

ह्या वर्षाच्या सांस्कृतिक कार्यक्रमातील समाजबांधवांच्या लोकवर्गणीतून जी उर्वरित वर्गणी आहे ती अंध, अपंग, अनाथाश्रम यांना दिली जाणार आहे.

तसेच समाजासाठी मार्गदर्शन करणारे आणि युवा समाजसेवक यांना राष्ट्रीय युवा दिनानिमित्त स्वामी विवेकानंद यांची प्रतिमा भेट म्हणून दिली जाते.

उपक्रमाचे वैशिष्ट्ये - गरजू व्यक्तींना ग्रुपतर्फे रक्तदान केले जाते (रक्त दिले जाते)

सण  २०१८  मध्ये संकल्प ग्रुप, शहादा यांनी गणेशोत्सव स्पर्धेत शहादा शहरात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या समाज बांधव आणि ग्रुप म्हणजेच (बेटी बचाओ- बेटी पढाओ) कन्या जन्माचा सत्कार उपक्रमास सदर कार्यक्रमास उपस्थिती तत्कालीन जिल्हाधिकारी मल्लीनाथ कलशेट्टी साहेब यांच्या उपस्थितीत गौरव चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले, हा ग्रुपचा पहिला सन्मान केला.

 ह्या उपक्रमाचे प्रेरणास्थान श्री. नरेंद्र हिरालाल वाडीले , नरुभाऊ (तालुकाध्यक्ष - भोई समाज, शहादा). हे आहेत

अभिमानाची आणि आनंदाची बाब म्हणजे ह्या उपक्रमाला अध्यक्षांच्या नावे १४ सप्टेंबर २०१९ रोजी अन्याय अत्याचार निर्मूलन समिती, धुळे यांनी समाजरत्न पुरस्कार दिला,  त्यानंतर धुळे येथील धुळे जिल्हा भोई समाज महासंघाच्या वतीने २० ऑक्टोबर २०१९ रोजी श्री. नरेंद्र वाडीले आणि श्री. मिलिंद वाडीले यांना समाजभूषण पुरस्कार दिला, नागपूर येथील भोई गौरव मासिकाच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त भोई गौरव पुरस्कार २ डिसेंबर २०१९ रोजी देण्यात आला. मिलिंद वाडीले यांना प्रदान करण्यात आला, यामुळे उपक्रम ग्रुपला स्फुर्ती मिळाली.

कन्या जन्माचा सत्कार उपक्रमातील कार्यकारणी खालीलप्रमाणे
अध्यक्ष - श्री. मिलिंद हिरालाल वाडीले, राम नगर, शहादा
उपाध्यक्ष - श्री. राजा काशिनाथ  खेडकर (राजकुमार) , शहादा
सचिव - स्वप्निल आधार मोरे ,शहादा
कोषाध्यक्ष - श्री. धनेश्वर प्रकाश भोई, शहादा 
संघटक -  श्री.किशोर नथ्थु मोरे , शहादा 
सल्लागार - श्री. विजय लक्ष्मण वाडीले ,शहादा (दादू वाडीले)
सदस्य - नंदिनी मोरे, वंशिका वाडीले,अंकिता वाडीले,  महिमा सोनवणे , विलास मोरे, राजेंद्र मोरे, स्वप्निल मोरे, प्रशांत सोनवणे, अविनाश मोरे, सुनिल मोरे, जितेंद्र वाडीले सर, छोटू वाडीले, बाळा साठे, कल्पेश वाडीले, मनोज वाडीले, लखन तावडे, योगेश मोरे, राहुल वाडीले, सागर वाडीले, राहुल नूक्ते, योगेश नूक्ते,अविनाश वाडीले आदी उपक्रमातील सदस्य आहेत.

माहिती संकलन :- स्वप्निल आधार मोरे आणि उपक्रमातील सदस्य यांच्याकडून माहिती प्राप्त झाली आहे.

Monday, April 20, 2020

स्वाभिमानी मी जातीन भोई


       स्वाभिमानी मी जातीन भोई..... 
           कवी:श्री चेतन मोरे सर नवापूर जि.नंदुरबार
        _सर्व समाज बांधवांना माझा जय भोईराज_*
  आपल्या या भोई समाजाची महती मांडावी तेवढी कमीच आहे तरी पण मी माझ्या जीवनात पाहिलेला, ऐकलेला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पणे अनुभवलेला आपला ह्या स्वाभिमानी भोई समाजावर काही लय बद्ध ओळी.....
👇👇👇👇

स्वाभिमानी मी जातीन भोई
_स्वाभिमानी मी जातीन भोई.._

चणा फुटाणा भट्टीवर फोडी
  नदी तलाव मा मासा बी मारी
ओळख मनी हौज प्रमुख व्यवसायी
_स्वाभिमानी मी जातीन भोई...._


माणुसकी धर्म सदा पुढे नेई
दयावान मी भावनिक हृदयी
हार मानायला जीवनात शिकलोच नाही
_स्वाभिमानी मी जातीन भोई..._


गरीब मी श्रीमंत खूब नाही
आली दरिद्री तरी घाबरत नाही
ताठ मानेने सदा जगत राही
_स्वाभिमानी मी जातीन भोई...._

स्वाभिमानी हा कधी झुकत नाही
याचा फायदा पुढारी घेई
हिम्मतीवर भोईचा तो नेता होई
हा बिचारा दोस्ती यारी निभावत राही
_स्वाभिमानी मी जातीन भोई..._

कमी हा भोई कुठेच नाही
मागे पडतो कारण संघटित नाही
तुझ्यात आहे कौशल्य तू वापर रे भोई
संघटित होण्याचा कर बाबा निश्चई
_स्वाभिमानी मी जातीन भोई..._

अशिक्षित नाहीच तू उच्च शिक्षित हाई
तरी का वागतोस अनाडी वाणी
Unity Is The Strength हे काय तुला ठाऊक नाही
_स्वाभिमानी मी जातीन भोई..._

एकजुटीने लढ
आपण जिंकू हक्काची लढाई
दुनियेला आपण दाखवून देवू
भोई राजा आहे हा पालखीचा भोई
_स्वाभिमानी मी जातीन भोई..._

🌹💐🌹💐🌹💐🌹
कवी:श्री चेतन मोरे सर
*_भोईसमाज युवामंच अध्यक्ष, उत्तर महाराष्ट्र विभाग_*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Sunday, April 19, 2020

शुभारंभ वधु वर नोंदणीचा.....

🚩 *जय भोईराज* 🚩

                *शुभारंभ...!!!!*
💐☘️💐☘️💐☘️💐☘️💐☘️💐

*वधु - वर परीचय नोंदणीचा*
✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻

*औचित्य मत्स्यसहकार महर्षी स्व.खा. जतिरामजी बर्वे साहेब जयंती उत्सव सोहळा २१ एप्रिल २०२०*


सर्व समाज बांध‌व व पालकांना मानाचा जय भोईराज कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे कि भोईसमाज युवा मंच आपल्या सेवेत वधु वर परीचय नोंद आपल्या ब्लॉग च्या माध्यमातुन करण्याचा शुभारंभ करीत आहोत हि नोंद मोफत असुन सर्व पालक व समाज बांधवांनसाठी खुली असेल चला तर मग जाणुन घेऊया नोंदणी कशी करावी.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

*नोंदणीसाठी कृपया खाली दिलेल्या मार्गाचा अवलंब करावा :-*

१.  जय भोईराज म्हणुन
वधु/वर परीचय खाली दिलेल्या मायन्या मध्ये द्यावा.
               वधू / वर परिचय
               
नाव             :- 
जन्म दिनांक  :-
जन्म वेळ    :-
रंग            :-   
ऊंची         :-   
शिक्षण      :-   
व्यवसाय      :- 
वेतन         :- 
अपेक्षा      : -
बहीण/भाऊ     :- 
मूळ गाव :-
मामाचे नाव:-
मामाचे गाव:-
वडिलांचे नाव :-
पालकांचा संपूर्ण पत्ता:
पालकांचा संपर्क क्रमांक :-

२. सदर परीचय पुर्ण भरुण
निलेश वाडिले- 9011494777
निलेश साटोटे- 9975054010
चेतन मोरे- 9403717446
महारू शिवदे- 9260691964
राहुल भोई- 8999964366
या वॉट्स अप नंबर वर पाठवावा.

३. आपण दिलेला परीचय ब्लॉग वर टाकुन आपणा पर्यंत ब्लॉगची लिंक शेअर केली जाईल.

४. या लिंक वर आपण वेळो वेळी भेट देऊन आपल्या पाल्यांसाठी साजेसा वधु-वर शोधु शकता.

*काहि महत्वपुर्ण सुचना आपल्या सर्वांच्या हितासाठी*
१. वधु किंवा वर यांच्या परीचयाची माहिती हि पालकामार्फत किंवा त्यांच्या परवानगीनेच पाठवावी.

२. वधु व वर यांनी परीचया सोबत आपले फोटो पाठवु नये फोटोचा गैरवापर होऊ नये म्हणुन आपण हि काळजी घेत आहोत तसेच थेट संपर्क होऊन दोन परीवारांचा परीचय वाढवा हा एक शुद्ध मानस या माध्यमातुन आहे.

३. संपर्क क्रमांक पालकांचाच असने बंधनकारक आहे वधु अथवा वरांना विनंती आहे कि परीचयात स्वःताचे संपर्क नंबर देऊ नयेत.

४. कृपया परीचय पाठवितांना अनअोळखी व्यक्तीचे परीचय पाठवु नये शहानिशा करतांना आढळुन आल्यास तो परीचय ब्लॉगवर नोंद केला जाणार नाहि.

५.वधु वर परिचय नोंदणी पूर्णपणे मोफत आहे याची सर्व समाज बांधव यांनी नोंद घ्यावी.

६.वधु वरांची खरी माहिती देणे   ही प्रत्येक पालकांची जबाबदारी आहे.

७.ब्लॉग वर असलेल्या वधु वर स्थळांची सत्यता तपासणी ही वधु वर पालकांची वैयक्तिक जबाबदारी आहे. याची नोंद घ्यावी.भविष्यात कोणताही प्रश्न उपस्थित झाल्यास त्यास संघटना जबाबदार राहणार नाही.

८.ब्लॉग ला नाव नोंदणी केल्यावर विवाह जमेलच याची खात्री संघटना देउ शकत नाही.

९.ब्लॉग वर असलेल्या माहितीचा कोणीही गैरवापर करू नये.तसे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

१०.ब्लॉगमुळे आपला विवाह जुळून आल्यास तसे आमच्या पदाधिकारी यांना कळवावे

११.वरील नियम व अटी मध्ये बदल करण्याचा अधिकार भोई समाज युवा मंच महाराष्ट्र ने राखून ठेवला आहे.


 *टीप:फक्त वर दिलेल्या पदाधिकारी यांच्याकडे दिलेले वधू वर परिचयच ब्लॉग वर टाकले जातील.*
*दिलेल्या सुचनांचे काटेकोर पणे पालन करुन सहकार्य करावे.*


आपलाच-
श्री निलेश दिलिप वाडिले
महासचिव,
भोईसमाज युवा मंच महाराष्ट्र
Website:bhoisamajyuvamanch1.blogspot.com

Saturday, April 18, 2020

आरक्षण SC का ST? लेख:-रोहितभाऊ शिंगाने

आरक्षण SC का ST? लेख:-रोहितभाऊ शिंगाने

 कोणत्या आधारावर आपण एसटी ची मागणी करणार आहात?
फक्त कोर्टात दावा टाकुन काय उपयोग?  त्याला काहीतरी आधार हवा आहे.

काहींनी एसटी , काहींनी एससी मागणी केली तर सरकार ठणकावणार नाही का की आधी तुमच्यातच नीट ठरवा म्हणून!!

*_सर्व सन्माननिय बांधवांनो ,  माझ्या अभ्यासानुसार खालील बाबी लक्षात घ्या :-_*

1. आपण _एससी_ किंवा _एसटी_ मागणी केली की लगेच देऊन टाकतील असे होणार नाही!
 2. एससी साठीचे व एसटी साठीचे कोणतेही _ठोस पुरावे नाहीत!_
3. 1936 ते 1950 चे एससी चे जे काही उपलब्ध पुरावे आहेत ते _अखंड महाराष्ट्र होण्या अगोदरचे आहेत._ ते पुरावे कोर्टात किती प्रमाणात ग्राह्य धरले जातील माहित नाही.
4. मीरा कुमार, लोकसभा अध्यक्ष व इतर एससी खासदार यांनी स्पष्ट ताकीद दिली होती की _एससी मागणी केली तर आम्ही तुमच्या मागणीला केराची टोपली दाखवू._
या कारणास्तव घाबरून जाऊन आपले ज्येष्ठ समाजसेवकांनी अकारण पुरावे नसतांना एसटी ची मागणी सुरू केली!
5. एससी किंवा एसटी मागणी करून,  समजा ती मागणी मान्य झाली,  तरी त्या त्या समाजातील लोकं उठाव करणारच,  कारण त्यांच्या आरक्षणात आपण हिस्सा बनू!
6. आपण Nomadic *Tribes*,  अर्थात *जमाती* आहोत. जर एससी मागणी मंजूर झाली तर आपण अनुसूचित *जातीत* समाविष्ठ होऊ. एकदाचे जातीत गेलो तर पुन्हा जमातीत येणे मुश्किल राहिल. कारण _भारतीय संविधान अनुसार   जमात ही जात असू शकते,  पण जात ही जमात असुच शकत नाही_, म्हणुन येथेही काळजी घेणे गरजेचे आहे.
7. समजा एससी किंवा एसटी मिळाले , तर *एन टी मधुन काढुन टाकले जाईल*. नंतर त्या समाजाने उठाव केला व एससी एसटी मधुन काढले,  तर *पुन्हा एनटी मिळवण्यासाठी लढावे लागु शकते* याचाही विचार करायला हवा.
8. याला उपाय म्हणून एससी किंवा एसटी ची मागणी न करता _भोईंची जणगणना करून लोकसंख्या नुसार 5_6% आरक्षण मागणी करता येणे शक्य होत असेल तर तशी करावी काय याचा विचार करायला हवा_
कारण त्या मागणीला विरोध करण्यासाठी कोणी विरोधी नसतील.


या वरील अभ्यासामुळे मी कोर्टात  जाण्याच्या घाईत नाही व कोणी जावे अशी शिफारस देखील करत नाही. अजून थोडा नीट अभ्यास करून एका विशिष्ट निर्णयावर शिक्कामोर्तब करायला हवा.

ही महत्वपूर्ण माहिती आपल्याला काय निर्णय घ्यायचा आहे,  त्यासाठी देतो आहे.

*_सर्वांना विनंती आहे की उगाच घाई गडबड करुन समाजाचे नुकसान होणार नाही हे पाहावे._*

  जय भोईराज
-इंजि.  रोहितभाऊ शिंगाणे,  धुळे
- समन्वयक, आरक्षण समिती
- भोई समाज सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष
(मॅनेजिंग डायरेक्टर
लक्ष्मी कन्स्ट्रक्शन)

बेरोजगार तरुणांसाठी छोटे व्यवसाय

बेरोजगार तरुणांसाठी काही छोटे व्यवसाय
कोणताही व्यवसाय असो, त्यात महत्त्वाचे म्हणजे विक्री. मग आपण एखादे उत्पादन किंवा सर्विस विकू शकता. त्यामुळे कोणताही व्यवसाय करायचा म्हटलं कि सर्वात आधी लोकांच्या गरजा काय आहे आणि आपण लोकांना काय विकू शकतो, ह्याचा अभ्यास करणे महत्वाचे आहे. याच अभ्यासातुन कोणता व्यवसाय करावा याचे उत्तर आपोआपच मिळेल. नवीन उद्योग करायचा म्हटलं कि त्यासाठी भांडवल, मार्केटिंग स्किल, अनुभव ह्या सर्व गोष्टींची आवश्यक्ता असते. पण असे काही व्यवसाय आहेत कि जिथे ह्या गोष्टी नसल्या, तरी तुम्ही चांगला व्यवसाय करू शकता. मुख्यतः ग्रामीण भागात तुम्ही काय उद्योग करू शकता हे आपण पाहू.
Smartelix-Mobile-Repairing-Business
१.  दैनंदिन जीवनात लोकांना अनेक खाद्य वस्तूंची आवश्यकता असते. अश्या रोज लागणाऱ्या वस्तूंची गरज लक्षात घेऊन तुम्ही किराणा दुकान / किरकोळ स्टोअर चालू करू शकता. एका लहानशा गावात व्यवसाय चालवण्यासाठी आणि उत्पन्न मिळण्यासाठी हा चांगला मार्ग आहे. एकदा का लोकांना गावातच खरेदीची सवय लागली कि मग व्यवसाय मोठा व्हायला वेळ लागत नाही.
२. गावात आज पिण्याच्या स्वच्छ पाण्याची समस्या गहन होत चालली आहे. त्यामुळे पाणी रिफिल स्टेशन / मोबाईल व्हॅन हा एक चांगला व्यवसाय आहे. अश्या मोबाईल प्युरिफिकेशन व्हॅन सिस्टिम खरेदी करण्यासाठी कर्ज सुविधा पण उपलबद्ध आहे. ज्या गावांमधे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे तिथे हा खरोखर फायदेशीर व्यवसाय आहे.
३. मोबाईल आज चैन न राहता गरजेचा झाला आहे. ग्रामीण भागात सुद्धा लोकांकडे सर्रास मोबाईल दिसून येतो. मोबाईल साठी लागणाऱ्या ऍक्सेसरीज, सिम कार्ड, रिचार्ज व्हाउचर्स आणि रिपेरिंग सर्विस यांची मागणी पण खूप वाढली आहे. हा व्यवसाय सुरु करायला गुंतवणूक कमी आणि फायदा जास्त आहे.Smartelix-Rural-Variety-Store-India
४. लहान मुलं असो किंवा मोठी व्यक्ती, आइस्क्रीम सगळ्यांनाच आवडते. जर तुमच्या गावाच्या आसपास जवळ कुठे आइस्क्रीम शॉप नसेल तर तुम्ही आइस्क्रीम शॉप हा रिटेलिंग व्यवसाय यशस्वीरित्या प्रारंभ करू शकता. अनेक मोठ्या ब्रॅण्ड च्या फ्रँचायसी घेऊ शकता.
५. माणसाच्या मुलभूत गरजांपैकी एक म्हणजे अन्न, त्यात खवय्यांची कुठेच काही कमी नाही. त्यामुळे चवीने खाणारे कधी कमी होत नाही. त्यामुळे एखादं हॉटेल / स्टॉल सुरु करू शकता. अगदी चहा, भेळ, मिसळ, भजी, वडा पाव, तर्री वडा, सामोसे यासारख्या भरपूर खपणाऱ्या खाद्यपदार्थांचे हॉटेल सुरु करू शकता. पुढे जाऊन याचे रूपांतर मोठ्या हॉटेल मधे करून प्रगती करू शकता. तसे पहिले तर हॉटेल व्यवसायाला कधीच मरण नाही.
६. आपण एका लहानशा गावात व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असल्यास, एक पुस्तक स्टोअर उघडू शकता. या स्टोअर मधे तुम्ही विविध लेखकांची विविध शैलींची पुस्तके विकू शकता अथवा भाड्याने देऊ शकता.
७. रिटेल फार्मसी स्टोअर हा एक आदर्श किरकोळ व्यवसाय. आपण जर परवानाधारक फार्मसिस्ट असल्यास किंवा एखाद्याचे लायसन्स भाडेतत्त्वावर घेऊन आपण रिटेल फार्मसी स्टोअर सुरु करू शकता. यात विविध निर्मात्यांकडून बनवलेली उत्पादने (औषधे आणि वैद्यकीय पुरवठा) तसेच इतर दैनंदिन लागणाऱ्या वस्तू आपण विक्री करू शकता.Smartelix-Photo-Studio
८. लोकांना रोज अनेक वस्तूंची गरज भासते. उदा. वह्या, पेन, रिफील, ग्रीटिंग्ज, गिफ्ट, खेळणी, मेहेंदी, ब्युटी क्रीम्स इत्यादी. अश्या सगळ्या वस्तू आपण जनरल / व्हरायटी स्टोअर च्या माध्यमातून विक्री करू शकता. ज्या ज्या वस्तू लोकांना दररोज लागतात त्या तुम्ही इथे उपलब्ध करून विकू शकता.
९. जर तुम्हाला संगणक दुरुस्ती चे ज्ञान असेल तर तुम्ही संगणकाची दुरुस्ती (लॅपटॉप आणि डेस्कटॉप) हा व्यवसाय सुरु करू शकता. या व्यवसायात आपल्याला फक्त संगणक दुरुस्ती कौशल्ये प्राप्त करणे, आवश्यक दुरूस्तीची साधने खरेदी करणे आणि नंतर एका चांगल्या ठिकाणी दुकान उघडणे आवश्यक आहे. या प्रकारच्या सेवांसाठी खूप मागणी आहे.
१०. सोशल मिडिया च्या वाढत्या वापरामुळे चांगले नव-नविन फोटो साठी खूप मागणी वाढत आहे. तुम्हाला जर फोटोग्राफी करायाला आवडत असेल आणि फोटो काढण्यासाठी लागणारे कौशल्य जर तुमच्याकडे असेल, तर फोटोग्राफी व्यवसाय तुम्ही लहानशा गावात यशस्वीरित्या प्रारंभ करू शकतो. एक चांगला स्टुडिओसह छायाचित्रकार म्हणून आपण केवळ आपल्या फोटो स्टुडिओमध्येच लोकांना आकर्षित करणार नाही, तर आपल्याला विवाह समारंभ, वाढदिवस, राजकीय सभा, मैफिली इत्यादीसारख्या कार्यक्रमांच्या ऑर्डर पण घेता येतील.
११. चांगले दिसणे प्रत्येकालाच आवडते. आजच्या तरुण, तरुणींमध्ये मेकअप करण्याची खूप क्रेझ आहे. याच वाढत्या गरजेचा फायदा घेऊन तुम्ही ब्युटी सलोन सुरु करू शकता. हा एक अत्यंत कमी गुंतवणुकीचा व अत्यंत फायदेशीर व्यवसाय आहे. त्यासाठी तुम्हाला आधी ब्युटी सलोन चा कोर्से पूर्ण करावा लागेल.
Smartelix-Indian-Bakery-Cookies-Biscuits
१२. आज प्रत्येक घरात अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा उपयोग केला जातोय व नवीन उत्पादनांची मागणी पण चांगली असते. वस्तू आहे म्हणजे ती खराब होणार आणि दुरुस्त करण्यासाठी चांगला इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक लागणार. इलेक्ट्रॉनिक वस्तू उदा. टीव्ही, मोबाईल, पंखे, फ्रिज सारख्या वस्तूंचे रिपेअरिंग सेन्टर आपण सुरु करू शकता. पण त्याआधी रिपेअरिंग चं ट्रैनिंग घ्यावे लागेल.
१३. आज लग्नसराई हि वर्षातून किमान सात-आठ महिने चालते. लग्नात मंडप, लाईट, डेकोरेशन सेट, जेनरेटर, भांडी अश्या अनेक गोष्टी लागतात. यापैकी कोणतेही साहित्य भाड्याने देण्याचा व्यवसाय सुद्धा चांगले उत्पन्न मिळवून देऊ शकतो.
१४. बेकरी प्रोडक्ट जसे पाव, ब्रेड, खारी, टोस्ट, बिस्कीट आणखी बरेच काही आपण स्वतः बनवून विकू शकता. स्वतः बनवणे शक्य नसल्यास जिल्ह्याच्या ठिकाणी ज्या काही मोठ्या बेकरी असतील त्यांच्याकडून होलसेल मध्ये विकत घेऊन स्थानिक बाजारात विकु शकता.
व्यवसाय म्हणजे विक्री हा नियम लक्षात ठेवा. काय विकायचं ठरवा, आणि कामाला लागा.
वरील माहिती आपणांस उपयोगी वाटली का? अजून काही व्यवसाय आहेत का, जे ग्रामीण भागात चांगले फायदेशीर ठरू शकतात? आम्हाला खाली कॉमेंट करून कळवा.

Friday, April 17, 2020

भोई‌‌राजा जागा हो.....

                नंदकिशोर धारपवार (विदर्भविभाग प्रमुख)
  भोई‌‌ समाज युवा मंच 
 चे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना
तसेच नवंनिर्वाचित मंडळीना माझा
    भोई राज
भोई समाज युवा मंच महाराष्ट्रातील सर्वात मोठं व्यासपीठ असुन इथं निस्वार्थी सेवा,समज,सुविचार,चांगल्या विचाराची देवाण घेवाण, जिद्द,प्रेम,आपुलकी,व समसमानता,आणि सर्वांत महत्वाचे,समाजाला दारीद्रीच्या दलदलीतून काढूण विकासाच्या प्रवाहात आणण्यांचे युवाकांचे प्रयत्न व त्या करीता सर्व युवकांची लाभलेली सांगड नक्कीच ह्या भोई समाजाला विकासापासुन कोणी रोखणार नाही भविष्यात भोई समाजाचे  चांगले दिवस येतीलचं असा विश्वास जाहीर ‌‌‌‌आणि समाजामधे क्रॉंती,परीवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही आणि ज्यांनी ज्यांनी याचा विडा,उचलला त्यांना सात पिढ्या हा समाज विसरणार नाही येणा-या पिढीला याचा  फायदा झाल्या शिवाय राहणार नाही म्हणुन गरज आहे ती फक्त संघटनची तुमच्या एकतेची

भोई राजा जागा हो!
भोई समाज युवा मंच्याचा धागा हो!

काही चुक झाल्या क्षमस्व

        आपला विश्वासु
          नंदकिशोर धारपवार
           विदर्भविभाग प्रमुख

Thursday, April 16, 2020

*कृपया प्रसिद्धीसाठी*
✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻
*भोई समाज युवा मंच* आता,,,,नव्या रंगात,,,,नव्या ढंगात,,,,
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
सर्व *भोई समाज युवा मंच महाराष्ट्र* च्या सर्व पदाधिकारी यांना सर्वप्रथम मानाचा 🚩 *जय भोईराज* 🚩

भोईसमाज सेवेसाठी, युवकांचे संघटिकरणासाठी तसेच जेष्ठ मार्गदर्शकांच्या पथदर्शनाने
युवकांनी उभारलेले, युवकांचे, युवा व्यासपिठ *भोईसमाज युवा मंच* गेल्या वर्षभरापासून ज्येष्ठांना सोबत घेऊन भोई समाजातील तळागाळातील युवकांना संघटीत करण्याचे काम करीत आहे,संघटनेतील सर्व पदाधिकारी मनोभावे समाजाच्या न्याय व हक्कासाठी लढत आहेत...
हे सर्व करत असतांना सर्व पदाधिकारी यांच्या सर्वसमावेशक सूचनेनुसार संघटनेच्या कार्यपद्धतीत आपण वेळोवेळी बदल आपण करीत आहोत. त्या अनुषंगाने सर्वानुमते आपण आपल्या संघटनेच्या *लोगोमध्ये* बदल करण्याचा निर्णय घेतलेला असून भोई समाज युवा मंचच्या सर्व राज्य विभाग,जिल्हा व तालुका पातळीवरील पदाधिकारी यांना आवाहन करण्यात येते की पुढील *लोगो* यापुढे वापर करावा,ही विनंती वजा सूचना...
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

*परिंदे रुक मत तुझमे जान बाकी है,*

*मंजिल दूर है, बहुत उड़ान बाकी है…..*

*आज या कल तेरी मुट्ठी में होगी दुनिया,*

*लक्ष्य पर अगर तेरा ध्यान बाकी है….*

*यूँ ही नहीं मिलती किसी को रब की मेहरबानी,*

*एक से बढ़कर एक इम्तेहान बाकी है,*

*जिंदगी की जंग में है ‘हौसला‘ जरुरी,*

*जीतने के लिए सारा जहान बाकी है।*

🚩 जय भोईराज...!! 🚩
🤝🏻🤝🏻 *उद्देश तोच* 💪🏻💪🏻 *जोश नवा*
   

      🙏🏻🙏🏻 *विनित*🙏🏻🙏🏻
*भोई समाज युवा मंच महाराष्ट्र प्रदेश*

Wednesday, April 15, 2020

भोई समाज युवा मंच मध्ये सामील व्हा.........

भोई समाज युवा मंच महाराष्ट्र प्रदेश
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdgWSUf6CxI_y55vv1-H6nnCT8-ioq74Q77RHX8mHbP3ZtDRw/viewform?usp=sf_link
*सामील व्हा.....*
*सामील व्हा....*
🚩 भोई समाज युवा मंच महाराष्ट्र प्रदेश🚩
🚩 !! जय भोईराज !! 🚩
भोईसमाज सेवेसाठी, युवकांचे संघटिकरणासाठी तसेच जेष्ठ मार्गदर्शकांच्या पथदर्शनाने
युवकांनी उभारलेले, युवकांचे, युवा व्यासपिठ भोईसमाज युवा मंच मध्ये सामील व्हा...💐💐💐💐💐
*संघटनेची उद्दिष्टे*
१. युवा संघटिकरण
२. रोजगार व व्यवसाय निर्मिती
३.आरक्षण
४.समाजाच्या हक्कासाठी लढणे
५.समाज प्रगती पथावर आणणे.
६ गुणवंत विद्यार्थी सत्कार
*टीप*
✊🏻✊🏻✊🏻
*जे समाज बांधव भोई समाज युवा मंच मध्ये सामील होण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी लवकरात लवकर फॉर्म मध्ये माहिती भरून सहकार्य करावे.*
🐋🐋🐋🐋🐋
*🙏🏻विनीत🙏🏻*
*भोई समाज युवा मंच महाराष्ट्र प्रदेश*


😊 *भोई समाज युवा मंच* 👌

*
*सर्व समावेशक..,,,,भोई समाजासाठी*
कसे व का? ते त्यासाठी 👇पूर्ण पोस्ट वाचा

ससा आणि कासवाच्या शर्यतीत ससा झोपून राहिल्याने हरला. कासव जिंकले पण सशाला शांत बसवेना . आपल्यात वेगाने पळण्याची क्षमता अधिक असूनही निव्वळ झोपल्यामुळे आपण हरलो हे त्याच्या लक्षात आले. पराभवाचा हा सल संपविण्यासाठी त्याने कासवापुढे पुन्हा शर्यतीचा प्रस्ताव ठेवला. विजयाच्या आनंदात आपण जिंकू शकतो, यावर विश्वास बसलेल्या कासवाने होकार भरला. शर्यत पुन्हा सुरू झाली. यावेळी सशाने चूक केली नाही. तो थांबला नाही. झोपला नाही. परिणामी, वेगवान ससा शर्यत जिंकला. हळू चालणारे कासव हरले.

*पण एकदा विजयाची चव चाखलेलं कासव हार पत्करायला तयार नव्हतं.* कासव पुन्हा सशाकडे गेलं. म्हणालं,'मी तुझं ऐकलं. आता तू माझे ऐक. आपण पुन्हा शर्यत लावू !'ससा हसला आणि म्हणाला,

 *"एकदा माझ्या चुकीमुळे हरलो. पुनःपुन्हा मी ती चूक कशी करेन ?* पण तुझी हरण्याचीच इच्छा असेल तर लावू पुन्हा शर्यत !' सशाचा होकार मिळाला तसं कासव म्हणालं, 'पण यावेळी शर्यतीचा मार्ग मी ठरवणार !' स्वतःच्या वेगाची आणि कासवाच्या धिम्या गतीची खात्री असलेल्या सशाने त्यालाही होकार भरला .

 शर्यतीचा मार्ग कासवाने ठरवला. शर्यत पुन्हा सुरू झाली ससा चूक करणार नव्हता. तो वेगात पळत राहिला. कासव मागे राहिलं पण पळता पळता अचानक ससा थबकला. जागेवर थांबला. *पुढे आडवी नदी वाहत होती.* कासवाने बरोबर मार्ग काढला होता. सशाला पोहता येत नव्हतं. ससा तिथेच थांबुन राहिला. हळूहळू येणारं कासव तिथे पोहोचलं. त्याने सशाकडे सस्मित पाहिलं आणि नदीत उडी मारून पलीकडच्या काठावर पोहत पोहोचलही.शर्यत कासवाने जिंकली. *सशाच्या वेगक्षमतेवर कासवाने स्वतःच्या बुद्धिक्षमतेने मात दिली.* हरलेला ससा विचार करत राहिला. आपल्याला पोहता येत नाही, म्हणून आपण हरलो, हे त्याच्या लक्षात आलं.तो विचार करून पुन्हा कासवाकडे गेला.

म्हणाला,'

*मित्रा, आपण आजपासून शर्यत नाही लावायची.आजपासून एक करायचं. जिथे जमीन असेल तिथे मी तुला पाठीवर घेईन. जिथे नदी आडवी येईल तिथे तू मला पाठीवर घे. दोघे मिळून आपण असे पुढे जात राहिलो, तर सर्वात पुढे आपण दोघेच असू !'*

 प्रत्येकात साऱ्या गोष्टी अथवा गुण कधीच नसतात. मात्र प्रत्येकात काहींना काही गुण असतोच.जे आपल्यात नाही ते इतरांकडे असू शकते. जे इतरांकडे नाही ते आपल्याकडे असू शकतं.

*अशा एकमेकांच्या गुणांचा वापर करीत आपल्यातला उणेपणा भरून काढता येतो.सर्वोत्तम यश गाठता येतं.*

 *एकमेकांना पराभूत करण्यात शक्ती खर्ची घालण्यापेक्षा एकमेकांच्या शक्तीच्या बळावर बलाढ्य काही करता येतं.*

*वैयक्तिक मोठेपणाच्या अभिलाषेपायी निव्वळ दुसऱ्याच्या चुका काढण्यापेक्षा, त्यांच्यातील चुकांकडे दुर्लक्ष करून त्यांच्यातील उत्तम गुण हेरून त्यांचा वापर करून घेणं, ही खरी यशस्वी क्रियाशीलता !*

काही लोकांकडे कल्पनाक्षमता असते;पण कल्पना सत्यात उत्तरावणारी कृतीक्षमता नसते.काहींकडे शक्ती असते; पण योग्य नियोजनक्षमता नसते. काहींकडे संघटनक्षमता असते; पण निर्णयक्षमता नसते. निर्णयक्षमता असते; तर नेतृत्वक्षमता नसते.

*अशावेळी ज्याच्याकडे जे आहे त्याचा त्याच्या गुणांचा योग्य वापर करीत सांघिकपणे पुढे जाणे म्हणजेच बिकट रणांगणही जिंकणे!*

यश मिळवायचं असेल तर असे गुण आणि गुणी माणसं वेचणं हे फार महत्त्वाचं !

संकटाच्या क्षणी गोगलगायीसारखे पोटात पाय घेऊन स्वतःच्याच कोषात लपून राहणं टाळलं पाहिजे!

याउलट जास्तीत जास्त माणसं जोडा.
जुन्या सौहार्दाचा शोध घ्या !
नव्याने मैत्री करा.
साऱ्यांच्या संपर्कात राहा.
मिळूनमिसळून वागा.

*तुमच्यासाठी जे जे उत्तम ते ते शोषून घेण्यासाठी तत्पर असलेले टिपकागद व्हा !*

*तर मग चला 🙏🤝🏻भोई समाज युवा मंचात सहभागी व्हा....*

*भोई समाजातील सर्वांचे सर्वांसाठी असलेले एकमेव व्यासपीठ..,, जिथे जेष्ठ, युवा व महिलांना एकसारखा सन्मान देणारे भोई समाज युवा मंच*
😊🙏🏻😊🙏🏻😊🙏🏻😊🙏🏻😊
*भोई समाज युवा मंच, महाराष्ट्र*

भोई समाज युवा मंच मध्ये सामील व्हा